ओशो पुण्यतिथी : त्यांचं जीवन आणि विचारांशी निगडीत खास गोष्टी

आध्यात्मिक गुरू ओशो १९ जानेवारी १९९० मध्ये पुणे येथील आश्रमात देहत्याग केला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत.

Updated: Jan 19, 2018, 12:29 PM IST
ओशो पुण्यतिथी : त्यांचं जीवन आणि विचारांशी निगडीत खास गोष्टी title=

नवी दिल्ली : आध्यात्मिक गुरू ओशो १९ जानेवारी १९९० मध्ये पुणे येथील आश्रमात देहत्याग केला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत. आम्हीही तुमच्यासाठी ओशो यांच्या जीवनाशी आणि विचारांशी निगडीत १० गोष्टी सांगणार आहोत. 

त्यांचं जीवन आणि त्यांचे विचार

- ओशो यांना उगाच बोलणे पसंत नव्हते. ते म्हणत होते की, ही बकवास गोष्ट आहे. माझे शब्द संवाद आहे.
 
- ओशो हा शब्द लॅटिन भाषेतील ओशनिक या शब्दापासून घेतलाय, याचा अर्थ समुद्रात विलीन होणे असा आहे.

- ओशो यांची कुंडली पाहून वाराणसीच्या ज्योतिषांनी सांगितलं होतं की, हा मुलगा सात वर्षांपेक्षा जास्त जिवंत राहणार नाही. जर जिंवत राहिलाच तर त्याची बुद्ध होण्याची शक्यता आहे. 

- आचार्य रजनिशने आपलं पहिलं शिबिर १९६४ मध्ये राजस्थानच्या कनकपुरमध्ये घेतलं होतं.

- ओशो यांना ११ भाऊ-बहिण होते. त्यांच्या वडीलांनीही त्यांच्याकडून सन्यास घेतला होता. असे म्हटले जाते की, सन्यास घेताना ते ओशोचे पाय पकडून रडले होते.
 
- ओशो यांचं म्हणनं होतं की, भीतीसोबत कोणताही व्यक्ती जगू शकत नाही. ते म्हणाले होते की, जिथे भीती संपते, तिथेच जीवन सुरू होतं. 

- त्यांचं म्हणनं होतं की, ही दुनिया अपूर्ण आहे. ही दुनिया अपूर्ण आहे त्यामुळेच मला तिच्यावर प्रेम आहे. जर दुनिया पूर्ण असती तर मरण पावली असती. 

- जग तुमच्याबद्दल काय विचार करतं याचा विचार करू नका. आपल्या वेगळेपणाचा सन्मान करा. दुस-यांशी आपली तुलना करू नका. स्वत:वर संतुष्ट रहा.

- जीवन जगण्याचा अंदाज काहीही असो, पण स्वत:ला स्विकारणे सर्वात मोठी बाब आहे. ओशो सांगत होते की, स्वत:ला स्विकारणे सर्वात कठिण काम आहे, कारण हे तुमच्या शिक्षण, संस्कृती आणि प्रशिक्षणा विरूद्ध असतं. 

- ते सांगतात की, तुमच्या भूतकाळाला तुमच्या वर्तमानावर हावी होऊ देऊ नका. भूतकाळाचं ओझं उचलून काहीच फायदा नाहीये. 

ओशो यांच्या मृत्युचं रहस्य

धार्मिक गुरू असूनही ओशो अतिशय बेधडक होऊन आपले विचार मांडत होते. त्यामुळे त्यांच्या विचारांवरून नेहमीच वाद होत होते. पण त्यांच्या मृत्युवरून जो वाद सुरू झाला तो आजपर्यंत संपला नाहीये. १९ जानेवारी १९९० मध्ये ओशो यांनी देहत्याग केला होता. पण त्यांच्या मृत्युवर शंका घेण्यात आली होती. त्यांच्या काही शिष्यांनी ओशो यांचा मृत्यु नैसर्गिक नसल्याचा दावा केला. आजही याला उलगडा झाला नाहीये. 

डॉक्टरांना बोलवूनही भेटू दिलं नाही

डॉ. गोकाणी म्हणाले होते की, ते आश्रमात उपस्थित असल्यवरही त्यांना ओशोनां बघूही दिलं नाही. त्या दिवशी आश्रमाचे स्वामी जयेशचे प्रायव्हेट सेक्रेटरी स्वामी चितन यांनी त्यांना फोन करून बोलवले होते. त्यांना सांगण्यात आलं होतं की, ओशो देहत्याग करत आहेत, तुम्ही त्यांना वाचवा. पण जेव्हा डॉक्टर तिथे पोहचले त्यांना ओशो यांच्याजवळ जाऊच दिले नाही. त्यानंतर अचानक शेवटच्या क्षणी ओशो यांच्यासोबत असलेले डॉक्टर अमृतो यांनी सांगितले की, ओशो यांचं जीवन संपत आहे.

डॉ. गोकाणी यांनी काही तर्कांसोबत कोर्टात एक अ‍ॅफिडेविट सादर केले होते. डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात संपूर्ण घटनाक्रम लिहिला होता. त्यांनी लिहिले की, ‘तिथे मी साधारण २ वाजता पोहोचलो. त्यांच्या शिष्यांनी सांगितले की, ओशो देहत्याग करत आहेत. तुम्ही त्यांना वाचवा. पण मला त्यांच्याजवळ जाऊ दिलं नाही. अनेक तास आश्रमात फिरत असताना मला त्यांच्या मृत्युची बातमी देण्यात आली आणि सांगितले की, डेथ सर्टिफिकेट तयार करा’.

तर दुसरीकडे ओशो यांच्या सचिव नीलम यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्युबाबत शंका व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ओशो यांची आई सुद्धा आश्रमात राहत होती. पण त्यांनाही मृत्युची सूचना उशिरा दिली गेली. ओशो यांच्या मृत्युनंतर बराच वेळ त्या ‘बेटा उन्होने तुम्हे मार दिया’, असे म्हणत राहिल्या, 

डॉ. गोकाणीच्या येण्याने ठक्कर यांना बळ

ओशो यांच्या मृत्युवर शंका घेणारे ठक्कर यांना अचानक प्रकाशझोतात आलेल्या डॉ.गोकाणी यांचे समर्थन मिळाले. डॉक्टरांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, ‘ओशो यांच्या मृत्युचा वाद बाहेर येऊ नये म्हणून मी काहीच बोललो नव्हतो. पण काही वर्षांनी अमृतो आणि जयेश जी वक्तव्य केले आहेत त्यात तफावत आहे. मला केवळ डेथ सर्टिफिकेट देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. १९ जानेवारी १९९० या दिवशी आश्रममध्ये अनेक डॉक्टर होते. तरीही अमृतो आणि जयेशने कुणाची मदत घेणे किंवा त्यांना रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे समजले नाही. त्याहून महत्वाची बाब म्हणजे मृत्युच्या पब्लिक अनाउंन्समेंटच्या ६० मिनिटांनंतरच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले’.