मुकेश अंबानींना वाटते फक्त या गोष्टीची भीती? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पण त्यांनाही काही गोष्टींची भीती वाटते..

Updated: Apr 21, 2022, 08:40 AM IST
मुकेश अंबानींना वाटते फक्त या गोष्टीची भीती? वाचून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पण त्यांनाही काही गोष्टींची भीती वाटते..त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

मुकेश अंबानी हे पेट्रोलियम रिफायनरी ते टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. आपल्या उद्योगात त्यांनी अनेक निर्णय बेधडक घेतले आहेत. पण वैयक्तिक आयुष्यात त्यांना एका गोष्टीची थोडी भीती वाटते.

वयाच्या 18 व्या वर्षापासून कामाला सुरूवात

मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला. धीरूभाई अंबानी यांचे ते जेष्ठ सुपुत्र होत. ते 18 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी पॉलिस्टर यार्न प्लांट उभारण्याचे काम सुरू केले. त्यावेळी मुकेश अंबानी शिक्षण घेत होते. पण ते वडिलांच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्यांच्यासोबत काम करू लागले. प्लांट सुरू झाल्यानंतर, वडिलांनी मुकेश यांना त्यांच्या शिक्षणात लक्ष देण्यास सांगितले. परंतू मुकेश यांनी अभ्यासासोबतच व्यवसायाकडेही लक्ष केंद्रित केले.

मुकेश अंबानींना याची का भीती वाटते?

शालेय जीवनात मुकेश अंबानी यांना हॉकी खेळण्याची आवड होती. पण तो स्वभावाने अतिशय लाजाळू व्यक्ती आहे. म्हणूनच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असूनही तुम्ही त्यांना खूप साधेपणाने बोलताना पाहिले असेल.

एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी स्वत: सांगितले की, ते खूप लाजाळू आहेत आणि सार्वजनिक बोलण्यास घाबरतात. त्यांनी आजपर्यंत दारूला हात लावलेला नाही. वडिलांसोबत भरपूर काम केल्याने त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. 

आपल्या लाजाळू स्वभावामुळे मुकेश अंबानी मीडियाला फारशा मुलाखती वगैरे देताना दिसत नाहीत. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाही. त्यांची बहुतेक भाषणे मोठ्या गुंतवणूकदार संमेलनात किंवा त्यांच्या कंपनीच्या एजीएमध्येच ऐकायला मिळतात.

वडिलांचा वारसा

रिलायन्सचा पाया मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी रचला होता. केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत पेट्रोलियम आणि केमिकलचा व्यवसाय सुरू केला. 1985 मध्ये, कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड वरून बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले. 2002 मध्ये धीरूभाई यांचे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतली.

अलीकडेच त्यांच्या कंपनीने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला आणि Jio Infocomm सारखा व्यवसाय सुरू केला. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे बाजार भांडवल 17.21 लाख कोटी रुपये आहे.