सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर भागात दहशतवाद्यांचा कुरापती सुरूच....सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई

Updated: Nov 17, 2021, 06:24 PM IST
सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा title=

कुलगाम: जम्मू-काश्मीर इथल्या कुलगाम परिसरात सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. 

काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंबई आणि गोपालपोरा गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. दोन्ही ठिकाणी अजूनही चकमक सुरूच आहे.

याआधी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या कुरापती संपण्याचं नाव घेत नाही. सुरक्षा दलाने त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

यापूर्वी १५ नोव्हेंबरला श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. अधिकाऱ्यांच्या मते या वर्षात आतापर्यंत 135 हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्नान घालण्यात आलं आहे.