कधी पाहिलीय शून्य रुपयाची नोट? केव्हा आणि का छापली ही नोट जाणून घ्या

शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटोही छापण्यात आला आहे.

Updated: Dec 24, 2021, 12:43 PM IST
कधी पाहिलीय शून्य रुपयाची नोट? केव्हा आणि का छापली ही नोट जाणून घ्या title=

मुंबई : भारतात रिझर्व्ह बँक (RBI) 1 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा छापते. या नोटांचा वापर करून लोक दैनंदिन गरजेच्या वस्तु तसेच सेवा विकत घेतात. आपण आतापर्यंत आपल्या चलनात 1 रुपये ते 2 हजार रुपयाचेच चलन पाहिले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की देशात शून्य (0) रुपयांच्या नोटाही छापल्या जातात? तुम्ही म्हणाल की आता हे कसं शक्य आहे? अशाप्रकारची नोट आम्ही कधी पाहिलीच नाही. तर आज आम्ही तुम्हाला या नोट बद्दल काही माहिती सांगणार आहोत.

एका विशेष मोहिमेअंतर्गत ही नोट छापण्यात आली

या शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटोही छापण्यात आला आहे, तर ती इतर नोटांसारखीच दिसते. मात्र शून्य रुपयांची नोट का चलनात आली असा प्रश्न तुम्हाला पडला असावा. तसेच या नोटने काय खरेदी केले जाऊ शकते. असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असणार.

तर हे जाणून घ्या की, ही नोट आरबीआयने जारी केलेली नाही. वास्तविक, भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत या नोटची निर्मिती करण्यात आली होती.

5 लाख नोटा छापल्या

ही नोट एका संस्थेने भ्रष्टाचाराविरुद्धचे हत्यार म्हणून सुरू केली होती. ही कल्पना 2007 साली दक्षिण भारतातील एका ना-नफा संस्थेची (NGO) होती. तामिळनाडूतील 5th Pillar नावाच्या या NGOने सुमारे पाच लाख शून्य रुपयांच्या नोटा छापण्याचे काम केले होते. या नोटा हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये छापून लोकांमध्ये वितरीत करण्यात आल्या.

नोटेवर भ्रष्टाचाराविरोधात अनेक संदेश लिहिले होते

भ्रष्टाचाराच्या विरोधात बनवलेल्या या चिठ्ठीत अनेक संदेश लिहिले होते, त्यात 'भ्रष्टाचार संपवा', 'कोणी लाच मागितली तर ही नोट द्या आणि प्रकरण आम्हाला सांगा', 'मी लाच घेणार नाही याची शपथ घेतो.' असे अनेक संदेश लिहिले होते.

या शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटोही छापण्यात आला आहे, नोटेच्या तळाशी उजव्या बाजूला संस्थेचा फोन नंबर आणि ईमेल आयडी छापण्यात आला आहे.

लाच मागणाऱ्यांना या विशेष नोटा देण्यात आल्या होत्या

'५वा स्तंभ' नावाची संस्था शून्य रुपयांची नोट बनवून लाच मागणाऱ्यांना देत असे. ही नोट भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेचे प्रतीक होती. तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये या संस्थेची केंद्रे होती. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि राजस्थानच्या पाली येथेही त्याची केंद्रे आहेत.