जोरदार वादळ आणि पावसाचा हवामान खात्याचा इशारा

निम्या भारतावर वादळाचा धोका

शैलेश मुसळे | Updated: May 6, 2018, 02:09 PM IST
जोरदार वादळ आणि पावसाचा हवामान खात्याचा इशारा title=

नवी दिल्ली : दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पंजाबमध्ये येत्या काही तासांत मुसळधार पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी हवामान विभागानं याबाबत अलर्ट जारी केला आहे. यासह निम्म्याहून अधिक भारतावर तीन दिवस वादळाचा धोका कायम आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यातही वादळाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात धुळीच्या वादळात पाच राज्यांमध्ये १२४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.