.....म्हणून मुलांना लग्नासाठी मुलींकडून मिळतो नकार

जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारल्यामुळे लग्नाची बोलणी फिस्कटतात...

Updated: Mar 29, 2018, 11:25 PM IST
.....म्हणून मुलांना लग्नासाठी मुलींकडून मिळतो नकार title=

मुंबई: आपल्यापैकी अनेक मुला- मुलांची लग्न खोळंबलेली असतात. अशा वेळी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, माझ्याजवळ जर सर्व गोष्टी आहेत. ज्याचा लग्नासाठी प्रामुख्याने विचार केला जातो. पण, लग्न काही जमत नाही.  अनेकांच्या बाबतीत समोरून उगाच नकार मिळत नाहीत. तर, त्याची काही महत्त्वाची कारणेही असतात. त्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे समोरच्या व्यक्तिला विचारले जाणारे प्रश्न. जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारल्यामुळे लग्नाची बोलणी फिस्कटतात...

या प्रश्नांमूळे मिळतो नकार

१-      तूला कसा पार्टनर हवा?

२-      तूला किती मित्र आहेत, फेसबूक, व्हाट्सऍपवर तू तूझ्या मित्रांसोबत बोलतेस / बोलतोस काय?

३-      तूला किती बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड आहेत?

४-      तूला पिरीयड (मासिक पाळी) किती तारखेला येतो?

५-      मुलांबद्धल (लग्न झाल्यावर जन्माला येणाऱ्या) तूझे मत काय?

६-      आता सांग बरं माझा स्वभाव तूला कसा वाटला?

७-      लग्ननंतर मी माझ्या मित्र / मैत्रिणींबसोबत फिरलेले किंवा त्यांना घरी आणलेले चालेल का?