जेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमान विरोधात उचललं मोठं पाऊल, त्यानंतर जे घडलं...

सलमान आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपबद्दल ती एक घटना, ज्यामुळे  ऐश्वर्याच्या वडिलांनी उचललं मोठं पाऊल  

Updated: Mar 8, 2022, 12:22 PM IST
जेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमान विरोधात उचललं मोठं पाऊल, त्यानंतर जे घडलं... title=

मुंबई : मैत्री-ओढ प्रेम आणि नंतर लग्न... रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला याच परिस्थितीतून जावं लागतं. मात्र प्रेम आणि लग्न यातील मधला काळ थोडा कठीण असतो. याच काळात एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. एक नातं याकाळात नव्याने जन्म घेत असतं. पण मधल्या काळात अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. असंच काही झालं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता सलमान खानसोबत. 

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त दोघांच्या नात्याच्या चर्चा होत्या. पण आता तर त्यांच्या वादाबद्दल अनेक गोष्टी समोर येतात. जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा कालांतराने त्यांच्यातील वाद समोर येवू लागले. 

सलमान खानकडून ऐश्वर्या रायचा छळ, भाईजानच्या जवळच्या व्यक्तीचा खुलासा

एकदा सलमान रात्री ऐश्वर्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने अभिनेत्रीच्या घरी गोंधळ घातला. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान ऐश्वर्याच्या घरी आल्यानंतर, वडील कृष्णराज राय यांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली. 

यावर सलमान म्हणाला होता, 'माझ्या कुटुंबाप्रमाणेच, ऐश्वर्या रायचे आई-वडील देखील रूढीवादी आहेत आणि माझ्या सर्व रिलेशनशिपबद्दल जाणून घेतल्यानंतर माझं आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा नव्हती....

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस तक्रारीवर बोलताना सलमान खान म्हणाला होता की, ऐश्वर्या रायच्या आई-वडिलांनी योग्य काम केलं, माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही. 'हम दिल चुके सनम'  सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्यामध्ये जवळीक वाढली होती.

पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सलमानसोबक ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. ऐश्वर्या आणि सलमानला एक मुलगी आहे, तिचं नाव आराध्या बच्चन आहे.