निधनाच्या एक वर्षांनंतर Nattu Kaka यांची शेवटची इच्छा समोर, डोळ्यात येईल पाणी

'नट्टू काका' म्हणूनच त्यांनी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांनी अशी केली त्यांची इच्छा पूर्ण   

Updated: Oct 3, 2022, 01:12 PM IST
निधनाच्या एक वर्षांनंतर Nattu Kaka यांची शेवटची इच्छा समोर, डोळ्यात येईल पाणी  title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका जवळपास 13 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.  मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत प्रेम, एकता, एकमेकांबद्दल असलेला आदर इत्यादी गोष्टी भावुक करणाऱ्या आहेत. फक्त आनंदातच नाही तर, दुःखात देखील एकमेकांची साथ देण्यासाठी एकत्र येणारे गोकुळ धामवासी.. नट्टू काकांच्या निधनाने पूर्णपणे कोलमडले. 

आज नट्टू काका म्हणजे अभिनेते घनश्याम नायक (Ghanashyam Nayak) आपल्यात नाहीत, पण त्यांच्या अठवणी कायम आपल्याला हसवतात. आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं. कामावर असलेलं त्याचं प्रेम आणि त्यांनी व्यक्त केलेली शेवटी इच्छा आज समोर आली आहे. 

नट्टू काका यांना शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचं होतं पण तसं होवू शकलं नाही. कर्करोगामुळे त्यांच्यावर 9 वेळी किमोथेरपी करण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे त्यांनी सुट्टीवर पाठवण्यात आलं. 

Nattu Kaka New : 'तारक मेहता...'ला मिळाले नवे नट्टू काका, जाणून घ्या कोण साकारणार भूमिका

नऊ महिन्यांच्या ब्रेकनंतर सर्वांचे लाडके नट्टू काका सेटवर परतले. पण मध्यंतरी त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यादरम्यान, त्यांनी आपल्या कुटुंबासमोर एक शेवटची इच्छा ठेवली व्यक्ती केली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत काम करायचं होतं पण तसं होवू शकलं नाही. (Nattu Kaka wanted to work till the last moment)

नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 3 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नट्टू काकांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांचा मेकअप करून घेतला आणि नट्टू काका बनवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे कुटुंबियांनी (nattu kaka family) त्यांची अखेरची इच्छा व्यक्त केली. (new nattu kaka)