बिग बॉ़स शोवर बंदी घालण्याची चाहत्यांची धमकी; पाहा का आली ही वेळ 

बिग बॉस ओटीटी 'संडे का वार'मध्ये शोचा होस्ट करण जोहरने डबल एलिमिनेशन जाहीर करून सगळ्यांना मोठा धक्का दिला.

Updated: Sep 6, 2021, 07:32 PM IST
बिग बॉ़स शोवर बंदी घालण्याची चाहत्यांची धमकी; पाहा का आली ही वेळ  title=

मुंबई : बिग बॉस ओटीटी 'संडे का वार' मध्ये शोचा होस्ट करण जोहरने डबल एलिमिनेशन जाहीर करून सगळ्यांना मोठा धक्का दिला. मिलिंद गाबा, अक्षरा सिंह आणि दिव्या अग्रवाल यांना बेदखलीसाठी नामांकन देण्यात आलं. कमी मतांमुळे करण जोहरने मिलिंद गाबा आणि अक्षरा सिंह यांना शोमधून काढून काढलं. चाहत्यांची आवडती अभिनेत्री अक्षरा सिंह शो मधून बाहेर पडल्याने तिचे चाहते खूप नाराज आहेत. अक्षरा सिंह भोजपुरी इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे 3.4 मिलीयन चाहते आहेत. तिच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे, अक्षराच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही की, तिचा बिग बॉसचा प्रवास इतक्या लवकर संपला आहे.

'पक्षपात'चा आरोप
अक्षराला बेदखल केल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी बिग बॉसच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. एवढंच नाही तर अक्षराच्या चाहत्यांनी शोचे निर्माते आणि करण जोहरवर 'पक्षपात' केल्याचा आरोपही केला आहे. चाहत्यांनी हा आरोप केला आहे की, निर्मात्यांनी शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांना शोचं विजेते बनवण्याचा निर्णय घेतला आहे.अक्षराच्या चाहत्यांचा असा विश्वास आहे की, ती भोजपुरी सुपरस्टार शमिता आणि राकेशपेक्षा चांगली आहे. या सोशल मीडिया युजर्सने या पक्षपाती वागणुकीवर या वादग्रस्त रिअॅलिटी शोवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

करण जोहरचा घेतला क्लास
खरं तर, गेल्या आठवड्याच्या 'संडे का वार' एपिसोडच्या सुरुवातीला, नेहा भसीनवर केलेल्या 'असभ्य वक्तव्या'साठी करण जोहरने अक्षरा सिंगच्या विरोधात बरेच क्लास घेतले. एवढंच नाही तर या फॅन स्पेशल एपिसोडमध्ये अनेक चाहत्यांनी अक्षराला खूप तीक्ष्ण प्रश्न विचारले. 'ही गोष्ट इतकी पुढे गेली की अक्षराने चाहत्यांची आणि करण जोहरची हात जोडून माफीही मागितली. एवढंच नाही तर तिने नेहा भसीनला तिच्या वक्तव्यासाठी 'सॉरी' म्हटलं.

चाहते संतप्त 
याच प्रसंगादरम्यान एका चाहत्याने अक्षराला विचारलं की, ती एक महिला असल्याने दुसऱ्या स्त्रीला अशी कमेंट करणं योग्य वाटते का? यावर अक्षरा सतत स्वत: ला न्याय देण्याचा प्रयत्न करत होती, यामुळे करण जोहर आणि घरचे इतर लोक तिच्यावर चिडले. पण अक्षरा सिंगच्या चाहत्यांना असं वाटतं की, शमिता शेट्टी आणि नेहा भसीन महान दाखवण्यासाठी शोच्या निर्मात्यांनी अक्षरा सिंग आणि दिव्याला जाणीवपूर्वक टारगेट केलं.