'तिच्या जाण्यानं...' दलजीत कौरसोबत लग्नाचं नातं मोडताच बिझनेसमॅन पती असं का म्हणाला?

Dalljiet Kaur's Husband Nikhil Patel Confirms Separation : लग्नाच्या वर्षभरात विभक्त होण्यावर दलजीत कौरच्या पतीची प्रतिक्रिया... 

दिक्षा पाटील | Updated: May 31, 2024, 02:55 PM IST
'तिच्या जाण्यानं...' दलजीत कौरसोबत लग्नाचं नातं मोडताच बिझनेसमॅन पती असं का म्हणाला? title=
(Photo Credit : Social Media)

Dalljiet Kaur's Husband Nikhil Patel Confirms Separation : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजीत कौरनं गेल्या वर्षी केन्या बेस्ड बिझनेसमेन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. पहिलं लग्न मोडल्यानंतर दलजीत बराच काळ एकटी होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा प्रेमाला संधी देण्याचा विचार केला. पण दुसऱ्या लग्नातही दु:ख किंवा निराशा मिळेल असं कोणाला वाटलं नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून दलजीत आणि निखिलमध्ये सगळं ठीक नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता दलजीतनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. ज्यात तिनं म्हटलं होतं की निखिलचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सुरु आहे. इतकंच नाही तर त्यानं हे लग्न मान्य करण्यास देखील नकार दिल्याचं तिनं सांगितलं. आता निखिल पटेलनं एक अधिकृत स्टेटमेंट जाहिर करत, यात त्यानं तिची बाजू मांडली आहे. 

निखिलनं सांगितलं की खरं तर त्यांच्यात असं काय झालं की त्यांचं लग्न हे एक वर्ष देखील टिकलं नाही. तर स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतनं तिचा मुलगा जेडनसोबत केन्या सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते विभक्त झाले. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला जेव्हा निखिल आणि दलजीत या दोघांनाही या गोष्टीची जाणीव झाली की त्यांच्या कुटुंबाचा पाया हा मजबूत नाही. दलजीतला केन्यामध्ये राहणं कठीण झालं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्या स्टेटमेंटमध्ये पुढे असं म्हणण्यात आलं आहे की मार्च 2023 मध्ये निखिल आणि दलजीतनं मुंबईमध्ये एकमेकांसोबत सप्तपदी घेतल्या. खरंतर हे सांस्कृतीकरित्या महत्त्वाचं होतं पण कायद्याने बंधनकारक नव्हतं. 100 टक्के देऊनही दलजीत केनियाच्या आयुष्यात स्थिरावू शकली नाही. तिची रोज धडपड सुरु असायची. तिला भारतात काम होतं आणि तिला इथे काहीच करता येत नव्हतं. या सगळ्यामुळे वैवाहिक जिवनावर त्याचा परिणाम होऊ लागला होता आणि त्या दिवशी तिच्या जाण्यानं निखिलसोबत तिचे नाते संपुष्टात आले आणि त्यांनी सकारात्मक पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर 'ही' अभिनेत्री घेतेय घटस्फोट; नात्यात नेमकं कुठं बिनसलं?

ज्या गोष्टीनं त्या सगळ्यांचे लक्ष वेधले ही ती आहे की दलजीतनं आता निखिलच्या आयुष्यात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निखिलनं सांगितलं की 'मी नेहमीच स्पष्टतेनं आणि आदरानं गैरसमज दूर करण्यावर विश्वास ठेवला आहे. केवळ माझ्यासाठीच नाही तर यात असलेल्या सगळ्या लोकांसाठी या रेकॉर्डला सेट करणं महत्त्वाचं आहे. मी दलजीतला मनापासून शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आपण सर्वजण सकारात्मकपणे पुढे जाऊ शकू.'