मालिका 'नागिन 3' लवकरच घेणार निरोप

टीआरपीच्या अव्वल यादीत असणाऱ्या 'नागिन 3'चे निरोप घेण्याचे ठोस कारण अद्याप सामोर आलेले नाही.

Updated: Jan 13, 2019, 11:24 AM IST
मालिका 'नागिन 3' लवकरच घेणार निरोप title=

मुंबई: फार कमी वेळात चाहत्यांच्या पसंतीस आलेली मालिका 'नागिन 3' लवकरच निरोप घेणार आहे. टीआरपीच्या अव्वल यादीत असणाऱ्या 'नागिन 3'चे निरोप घेण्याचे ठोस कारण अद्याप सामोर आलेले नाही. पण सूत्रांच्या माहितीवरुन  'नागिन 3' नंतर एक नविन मालिका मालिकाप्रेमींच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. 'नागिन 3' मध्ये हॉरर त्याचप्रमाणे खूपच सुंदर अंदाजात चाहत्यांच्या भेटीस येणाऱ्या अनीता हंसनदानी, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना या तारकांना आता बाय-बाय करण्याची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीवरुन विवेक दहियाची नविन मालिका 'कवज 2' नागिन 3ला रिप्लेस करणार आहे. 'नागिन 3' मालिकेचा शेवटचा भाग 12 फेब्रुवारीला शूट करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या शेवट्या आठवड्यात मालिका नागिन 3 निरोप घेणार आहे.

Image result for naagin 3 zee news

2015 साली 'नागिन' मालिकाचा पहिला भाग छोट्या पडद्यावर आला, त्यानंतर या मालिकेने उंच भरारी घेत 'नागिन 3'चा टप्पा गाठला. नागिन मालिकेच्या पहिल्या भागात मौनी रॉय आणि अदा खान यांच्या मनमोहन अदांनी चाहत्यांचे मनोरंजन केले होते. मालिकेत होणाऱ्या एकापेक्षाएक ट्विस्टमुळे मालिका नेहमीच हिट ठरली. विवेक दहियाची नविन मालिका 'कवज 2' प्रेक्षकांना आवडेल की नाही हे पाहणे मजेशीर ठरणार आहे आहे.