लागिरं झालं जी : शितलीच्या घरावर येणार का जप्ती?

काय होणार पुढे? 

मुंबई : 'लागिरं झालं जी' या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ४ ऑगस्टच्या एपिसोडची अजाच्या आर्मी कॅम्प मधून झाली. बेस कॅम्पमध्ये आपले सामान लावून अज्या नवीन नंबर घेतल्याचे सांगण्यासाठी शीतलला फोन करतो. दरम्याने शीतल जास्त थकल्याचे अज्याला कळते. तेवढ्यात मामांची हाक येताच शीतल फोन कट करते . पुन्हा एकदा मामी शीतलला राहिलेल्या कामांवरून पुन्हा बोचून बोलते. परंतु अज्याने सांगितल्याप्रमाणे मामींच्या बोलण्याकडे शीतल दुर्लक्ष करून पुन्हा आपल्या कामांमध्ये स्वतःला रमवून घेते. दुसरीकडे भैय्या आणि टॅलेंट अज्या गेल्याच्या बातमीने पुन्हा आनंद व्यक्त करीत असतात.

भैय्याच्या सांगण्यावरून त्यांचे गुंड शीतलच्या आई बाबांकडून पैसे घेऊन जातात आणि उद्यापासून घर सोडून जावे असे धमकी देऊन जातात. दरम्यान शीतल आपल्या आई बाबांना भेटायला आणि आपण पास झाल्याची बातमी देण्यासाठी घरी येते. व सारे जण आपल्या दुःखावर आनंदाचा पडदा टाकून शीतलशी बोलू लागतात. दरम्यान शीतल निघून गेल्यावर पुन्हा घरातील सारे पुन्हा दुःखात पार बुडून जातात. शीतलच्या माहेरावर आलेले हे संकट शीतलला कळेल का? या संकटावर मात करण्यासाठी शीतल कोणते पाऊल उचलेल हे बघण्यासाठी लाजिरं झालं जी या मालिकेचा उद्याचा भाग आवर्जून बघा.