अपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'?

यासाठी राजुमार हिरानीने केली रणबीर कपूरची निवड

अपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा मच अवेटेड सिनेमा 'संजू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबाबत रणबीर कपूर आणि संजय दत्त असे दोघांचे फॅन्स एक्सायटेड आहेत. आज या सिनेमाचं टीझर देखील रिलिज झाली आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाला दिग्दर्शित करत असून संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचे रणबीर कपूरचे काही फोटो व्हायरल झाले होते. आणि आता या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. मात्र आपल्याला माहितच आहे, शुटिंग सुरू होण्या अगोदर संजय दत्तने एका पार्टीत रणबीर कपूरचा प्रचंड अपमान केला होता. आणि ही गोष्ट सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली होती. 

संजय दत्तने रणबीरचा असा केला होता अपमान 

2016 च्या शेवटच्या दिवसांमध्ये संजय दत्तच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरला कास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा संजय दत्तने रणबीर कपूरला एका पार्टीत खूप अपमान केला होता. या पार्टीची आणि अपमानाची भरपूर चर्चा रंगली होती. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, त्या पार्टीत संजय दत्तने रणबीरला सगळ्यांसमोर विचारलं की, मला कळत नाही की, तुला या सिनेमासाठी का कास्ट केलं? या पार्टीत राजकुमार हिरानी, डेविड धवन आणि अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. यानंतर रणबीर कपूरने या सिनेमांसाठी काम केलं असून स्वतःला अगदी त्याच साज्यात बसवलं आहे. 

यासाठी राजकुमार हिरानीने रणबीर कपूरची निवड केली 

राजकुमार हिरानीने डीएनएसोबत बोलताना या सिनेमाबाबतच्या अनेक गोष्टी खुल्या केल्या. यावेळी त्यांनी संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरचीच का निवड केली याबाबत देखील सांगितलं. हिरानी यांनी या सिनेमासाठी रणबीरला मॅसेज केला होता. त्यांनी सांगितलं की, माझ्या कडे एक स्क्रिप्ट आहे याबाबत आपण एकदा भेटून बोलू. तेव्हा स्वतः रणबीर कपूर त्यांना म्हणाला की, मला आशा आहे की, हा सिनेमा संजय दत्तचा बायोपिक नसेल. तेव्हा त्यांनी मॅसेज केला की, हा तोच सिनेमा आहे पण मला तुझ्याशी भेटून बोलायचं आहे. 

हिरानी यांनी पुढे सांगितलं की, रणबीरने जेव्हा या स्क्रिप्टचे वाचन केलं तेव्हा खूप प्रभावित झाला. आणि मग तो लगेच या सिनेमांत संजय दत्तची भूमिका साकारायला तयार झाला. हिरानी यांनी हे देखील सांगितलं की, रणबीरने संजय दत्त यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. जसं की संजय दत्त यांच्या कॉन्ट्रीवर्सीज त्यामुळे तो या सिनेमाचा भाग होत नव्हता. मात्र स्क्रिप्ट ऐकल्यावर तो तयार झाला. त्यानंतर हिरानी यांनी पुढे सांगितलं की, रणबीरला त्याच्या वयामुळे देखील सिलेक्ट केलं. कारण मला असा अभिनेता हवा होता जो स्वतःला 21 ते 56 च्या वयात स्वतःला बघू शकेल. आणि मग हा सिनेमा शूट झाला. आणि तो जूनमध्ये प्रदर्शित होत आहे.