चित्रपटातील समांथाच्या किसिंग सीनवर काय म्हणाला नागा चैतन्य?

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य अक्किनेनी यांनी एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं चार वर्षांचं नातं संपवलं. 

Updated: Feb 5, 2022, 03:53 PM IST
चित्रपटातील समांथाच्या किसिंग सीनवर काय म्हणाला नागा चैतन्य? title=

मुंबई : अलीकडेच, सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य अक्किनेनी यांनी एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं चार वर्षांचं नातं संपवलं. दोघांनी घटस्फोट घेण्याचं कारण अगदी खाजगी ठेवलं होतं. त्यानंतर या एक्स-कपलच्या नात्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले होते. दरम्यान, दोघांशी संबंधित जुने किस्सेही प्रचंड व्हायरल झाले आहेत. यापैकी एक म्हणजे नागा चैतन्यची सामंथाने केलेली प्रशंसा.

सर्वांना माहीत आहे की, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य आज वेगळे झाले असतील, पण एक काळ असा होता जेव्हा दोघांमध्ये खूप प्रेम आणि समजूतदारपणा होता. समंथाने स्वतः तिच्या एक्स पतीचं कौतुक करताना सांगितलं होतं की, नागा खूप बुद्धिमान आहे. ते दोघेही घरात चित्रपटाबाबत चर्चा करत नाहीत, असंही ती यावेळी म्हणाली होती.

संध्याकाळी ६ नंतर कामावरून घरी परतल्यावर आम्ही फक्त विश्रांतीबद्दल बोलतो. ती पुढे म्हणाली की, तो एक अभिनेता असल्याने त्याला माहितीये की किस घेणं हा माझ्या कामाचा एक भाग आहे.

'रंगस्थलम' चित्रपटात लग्नानंतर समंथाला राम चरणसोबत किसिंग सीन सामंथाला द्यावा लागला. तेव्हाच्या वाक्याच्या संदर्भात अभिनेत्रीने हे विधान केलं आहे. मात्र, मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, हा किसिंग सीन नसून व्हीएफएक्सची कमाल होती. सीनमध्ये फक्त गालाला स्पर्श होता, लिप लॉक नव्हता. मात्र, पडद्यावर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनात हेच राहिलं की, सामंथानं खरंच हे केलं होतं, त्यामुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं.