अक्षय कुमार सोबतच्या वादावर अखेर कपिल शर्माने सोडलं मौन, ट्विट करत केला खुलासा

अक्षय कुमार हा कपिल शर्माच्या टीमवर नाराज असल्याची चर्चा आहे. कपिल शर्मा शोमध्ये अक्षय नेहमीच आवर्जुन हजेरी लावत असतो.

Updated: Feb 8, 2022, 09:19 PM IST
अक्षय कुमार सोबतच्या वादावर अखेर कपिल शर्माने सोडलं मौन, ट्विट करत केला खुलासा title=

मुंबई : कपिल शर्माच्या शोमध्ये अनेकदा स्टार्स त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जातात. असे पाहिले तर अक्षय कुमार सर्वात जास्त 'द कपिल शर्मा शो' ला जातो कारण तो एका वर्षात 4 ते 5 चित्रपट करतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचे कपिलसोबतचे नाते बिघडल्याच्या चर्चा होत्या. अक्षयने कपिलच्या शोमध्ये त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जाण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. या वृत्तांवर अक्षयने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, मात्र आता कपिल शर्माने मौन सोडले आहे.

कपिल शर्माने ट्विट करून केला खुलासा

कपिल शर्माने ट्विट केले की, अक्षय कुमारसोबत माझी जी काही समस्या होती, ती मी सोडवली आहे. कपिलने ट्विट केले- 'माझ्या प्रिय मित्रांनो, मी मीडियामध्ये माझ्या आणि अक्षय पाजीबद्दलच्या बातम्या वाचल्या. मी पाजीशी बोललो आहे आणि सर्व काही व्यवस्थित झाले आहे. हे सर्व मिस कम्युनिकेशन होते. आता सर्व काही ठीक आहे. आम्ही लवकरच बच्चन पांडेच्या शूटिंगवर भेटणार आहोत. तो माझा मोठा भाऊ आहे आणि तो माझ्यावर कधीही रागावू शकत नाही. धन्यवाद.'

प्रकरण काय होते?

'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला विनोद शोमध्ये कट करण्यासाठी सांगितला होता. पण तरी तो इंटरनेटवर लीक झाल्याने अक्षय नाराज झाला होता.

अक्षय कुमारचे चित्रपट

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट 18 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाशिवाय अक्षय कुमार राम सेतू, रक्षाबंधन, पृथ्वीराज, सेल्फी आणि सिंड्रेला सारखे आणखी चित्रपटात दिसणार आहे. गेल्या वेळी अक्षय कुमार सारा अली खान आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली.