'या' अभिनेत्रीने 5 वर्षाचं नातं तोडून घेतला घटस्फोट

बालिका वधू फेम अभिनेत्री 

'या' अभिनेत्रीने 5 वर्षाचं नातं तोडून घेतला घटस्फोट  title=

मुंबई : कलाकारांच्या लग्नाची जशी चर्चा होते अगदी तशीच कलाकारांच्या घटस्फोटाची देखील. कारण प्रेक्षक त्या कलाकारासोबत अगदी आपुलकीने जोडले जातात. 'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तोरल रासपुत्रा हिचा घटस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 वर्षाचं लग्नाचं नातं तुटलं आहे. तोरल आणि नवरा धवल यांनी हा निर्णय घेतला आहे. 

बालिका वधू या मालिकेतून प्रत्युषा बॅनर्जीही मालिका सोडली तेव्हा तोरल याचा भाग झाली होती. तोरलसाठी हा रोल अतिशय चॅलेंजींग होतं. कारण प्रत्युषाच्या रूपात आनंदी घराघरात पोहोचली होती. मात्र तोरलने अतिशय सुंदरप्रकारे प्रेक्षकांच्या मनात घरं केलं. 

 

Khubsurat yaadein 1st photoshoot for Balika Vadhu as Anandi. miss those days......... #majorthrowback #feelblessed #feelgrateful #lovethelook #timeflies

A post shared by Toral Rasputra (@toral_rasputra) on

२०१२ मध्ये तोरलचं लग्न धवल या उद्योगपतीशी झालं होतं. पण लग्नानंतर दोन वर्षांतच तोरल माहेरी परतली. आता पाच वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.  तोरल आणि धवल यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. ती म्हणाली, 'खूप प्रयत्न करूनही आम्ही हे लग्न वाचवू शकलो नाही. आपण ठरवू तसंच आयुष्यात घडत नसतं. पण मी आणि धवल चांगले मित्र बनून राहू.' तोरलने टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या, पण तिची 'आनंदी'ची भूमिकाच प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिली. या मालिकेत तिने प्रत्युष्या बॅनर्जीला रिप्लेस केलं होतं. पुढे मालिका संपेपर्यंत तोरलच 'आनंदी' साकारत होती.