अर्जुन बिजलानी-नेहा यांचं नातं कायमचं संपलं?

अर्जुन बिजलानी-नेहाच्या नात्यात  9 वर्षांनंतर फूट? वाचा नक्की काय घडलं

Updated: Mar 12, 2022, 06:33 PM IST
अर्जुन बिजलानी-नेहा यांचं नातं कायमचं संपलं?  title=

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या  नात्यात दुरावा आला अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या बातमीमुळे चाहत्यांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. सध्या त्याच्या आयुष्यात खूप मोठा तणाव असल्याचंही सांगितलं जात आहे. ही स्मार्ट जोडी आता वेगळी होणार का याची धाकधूक चाहत्यांना लागली आहे. 

अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीमध्ये तणाव असल्याची चर्चा एका पोस्टमुळे सुरू झाली आहे. अर्जुननं आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी एकत्र सोबत राहणं खोटं असल्याचं म्हणत हार्टब्रेक इमोजी शेअर केला आहे. ही पोस्ट त्याने त्याच्या नात्यातील तणावासाठी केली आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप अजून समोर आलं नाही. 

अर्जुनच्या या पोस्टमुळे चाहते टेन्शनमध्ये आहेत. अनेकांनी त्याला विचारलं काय झालं आहे. मात्र त्यावर अर्जुननं मौन धरणं पसंत केलं. त्यामुळे युजर्स, नेटकरी आणि चाहत्यांनी नात्यात तणाव आल्याचा कयासही लावला आहे. 

या सगळ्या प्रकारानंतर अर्जुनने आपल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. या पोस्टमागचं सत्य सांगितलं आहे. अर्जुन आणि नेहानं रिअॅलिटी शोमधील एक फोटो शेअर केला. त्यासोबत सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. प्रेम नेहमीच आहे. मी जी आधी पोस्ट केली होती त्याचा आणि माझ्या वैयक्तीक आयुष्याचा काहीही संबंध नाही. 

अर्जुन पुढे म्हणतो की, मला त्या पोस्टनंतर अनेकांचे फोन आणि मेसेज आले. खरं सांगू तर मी सगळ्यांचे आभार मानतो मला दिसतंय की लोक माझ्यावर किती प्रेम करत आहेत माझी किती काळजी करत आहेत. माझी काळजी आणि माझ्याबद्दल विचार करणाऱ्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्याप्रती खूप प्रेम.

अर्जुनने ही पोस्ट का केली होती याचं उत्तर मात्र त्याने अजूनही दिलं नाही. मात्र त्याच्या दुसऱ्या पोस्टनंतर चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियावर मात्र त्यांच्यात तणाव आला की अजून काय? अशी चर्चा रंगताना दिसत आहे.