सिद्धांत चतुर्वेदीचं 4 वर्षांनंतर ब्रेकअप, म्हणाला, 'तिला साधं आयुष्य हवंय, पण...'

'कहीं पहुंचने के लिए कहीं से निकना जरूरी होता है... ' सिद्धार्थ चतुर्वेदीचं 4 वर्षांनंतर ब्रेकअप, म्हणाला....  

Updated: Feb 28, 2022, 10:54 AM IST
सिद्धांत चतुर्वेदीचं 4 वर्षांनंतर ब्रेकअप, म्हणाला, 'तिला साधं आयुष्य हवंय, पण...' title=

मुंबई : आयुष्यात अचानक एका खास व्यक्तीची एन्ट्री होते... असं वाटतं ती व्यक्ती कायम आपल्यासोबत राहिली तर... आयुष्यात येणारे सुखः, दुःख त्या व्यक्तीसोबत शेअर करता आले तर... पाहिलेले स्वप्न दोघांना एकत्र पूर्ण करता आले तर... पण अचानक एक अशी वेळ येते आणि आपल्याला प्रेम आणि स्वप्न यांच्यांपैकी एकाची निवड करावी लागते. असं अनेकांसोबत होतं..

असाचं प्रसंग घडलं आहे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत एका मुलाखती दरम्यान सिद्धांतला प्रश्न विचारण्यात आला की, अशी कोणती घटना ज्यामुळे सगळं काही बदलून गेलं... याप्रश्नाचं उत्तर देताना सिद्धांतने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

सिद्धांत म्हणाला, 'जेव्हा मी 20 वर्षांचा होतो, तेव्हा मला माहिती होत आयुष्यात मला काय करायचं आहे. माझ्या स्वप्नांमुळे माझ्या 4 वर्षांच्या रिलेशनशिपचा अंत झाला... मी त्या मुलीसोबत 4 वर्ष होतो. मला तिच्यासोबत सेटल व्हायचं होतं...' 

'मला तिच्यासोबत सेटल व्हायचं होतं, पण तिला एक साधं आयुष्य होत. मी तेव्हा सीए करत होतो आणि मी क्षेत्र बदलण्याच्या विचारात होतो. माझा हा निर्णय तिला पटला नाही. तेव्हा मी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि माझ्या स्वप्नांना प्राधान्य दिलं.. आज मी याठिकाणी आहे...'

सध्या सिद्धांत महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. सिद्धांत 'गहराइया' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला पण सिनेमाला हवं तसं यश मिळालं नाही.