आव्हाडांसारख्या लोकांच्या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही- पुनम महाजन

राजकारण्यांच्या विचित्र बोलण्यामुळे महाराष्ट्राच्या सुंदर अशा इतिहासावर वाईट परिणाम होतो.

Updated: Jul 15, 2018, 06:19 PM IST
आव्हाडांसारख्या लोकांच्या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही- पुनम महाजन title=

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संत तुकारामांबद्दल केलेल्या वक्तव्यावर रविवारी भाजपा खासदार पुनम महाजन यांनी ताशेरे ओढले. आव्हाडांसारख्या लोकांचे बोलणे मी ऐकत नाही. मी तुम्हालाही सांगते की, प्रसारमाध्यमं आणि इतरांनीही अशा लोकांचे म्हणणे ऐकू नये. त्यांच्या विचित्र बोलण्यामुळे महाराष्ट्राच्या सुंदर अशा इतिहासावर वाईट परिणाम होतो. याउलट सर्वजण समान असतात, हे राजकारण्यांनी वारकऱ्यांकडून शिकावे, असे आवाहन पुनम महाजन यांनी केले. 

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक लाईव्हदरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. वरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य फेसबुकवरून हटवले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानं वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यात. वारकरी सांप्रदायानं आव्हाडांच्या या वक्तव्यावरून आपला निषेध नोंदवला होता.