पाच जण ठार

दोन कारची स्पर्धा बेतली जीवावर, अपघातात ५ जण ठार

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-देवळाली-प्रवरा रस्त्यावर नरसाळी शिवारात काल मध्यरात्री तिन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झालेत. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कारची स्पर्धा लावण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे.

Dec 14, 2017, 12:02 PM IST

बेडरूममधील भयाण चित्र पाहून बेशुद्ध झाली वहिनी...

भंगारचे व्यापारी मो. मुहर्रम यांच्या फॅमिलीतील 5 जणांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अलाहबाद घडली आहे. मुहर्रम यांची पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली. 

Sep 19, 2016, 06:22 PM IST

अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार झालेत. विशाळगड येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने आय ट्वेंटी कारमधून प्रवास करणारे ४ जण जागीच ठार झाले. तर एका ८ वर्षीय मुलीचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण पुण्याच्या हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर दूसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 8 जण गंभीररित्या जखमी  झालेत.

Jun 4, 2016, 11:50 PM IST