'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.