एक्सप्रेसचे डबे घसरले

एक्सप्रेसचे डबे घसरल्याने कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेसच्या इंजिनासह सहा डबे घसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे. मनमाडवरून अपघात निवारण गाडी आसनगावच्या दिशेनं रवाना करण्यात आली आहे. मनमाडवरुन सुटणारी मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.

Aug 29, 2017, 11:52 AM IST