मला फरक पडत नाही....; टीमच्या 5 पराभवानंतर सुर्यकुमार यादवचं धक्कादायक वक्तव्य

सुर्यकुमार यादवचा टीममध्ये समावेश झाल्यानंतरही टीमची अवस्था जैसे थे अशीच आहे. तर अखेर यावर आता सुर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Apr 16, 2022, 10:31 AM IST
मला फरक पडत नाही....; टीमच्या 5 पराभवानंतर सुर्यकुमार यादवचं धक्कादायक वक्तव्य title=

मुंबई : आयपीएलचा 15 वा सिझन मुंबई इंडियन्ससाठी चांगला राहिलेला नाही. या सिझनमध्ये मुंबईला अजून एकाही विजयाची नोंद करता आली नाही.  सलग 5 सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मुंबईवर टीका करण्यात येतेय. दरम्यान सुर्यकुमार यादवचा टीममध्ये समावेश झाल्यानंतरही टीमची अवस्था जैसे थे अशीच आहे. तर अखेर यावर आता सुर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याचा धोका आहे. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना उर्वरित 9 सामन्यांपैकी 8 सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत. अशात आता सूर्यकुमार यादवने फलंदाजीच्या क्रमावारीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईच्या टीममध्ये बॅटींग पोझिशन बदललेली दिसून नाही. यावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "मी जे करतोय ते मला आवडतंय आणि ते सामन्यांमध्येही दिसून येतंय. जेव्हा तुम्ही मुंबई इंडियन्सकडून खेळता तेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन येतं. यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज नाही."

माझ्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार टीम मॅनेजमेंटला आहे. मी तीन, चार, पाच किंवा सहा, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. माझ्यासाठी ते सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.

मला या गोष्टीचा फरक पडतो की मी कोणत्या परिस्थितीत फलंदाजी करतोय. मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो याचा मला फरक पडत नाही. अशा पद्धतीची फलंदाजी करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, असंही सुर्यकुमार यादवने सांगितलं आहे.