1/8
![टीपू सुलतान यांचा मृत्यू...
अठराव्या शतकातला शासक टीपू सुलतान मैसूर साम्राज्याचा शासक होता. टीपू सुलतानला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कट्टर शत्रू मानलं जात होतं. 1799 साली आपला श्रीरंगपटनमचा किल्ला इंग्रजांच्या फौजेपासून वाचवण्यासाठी झालेल्या युद्धात टीपू सुलतान यांचा मृत्यू झाला.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159281-tipu8.jpg)
2/8
![टीपूचा किल्ला
पालक्काड हा किल्ला टीपूचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. पालक्काड टाऊनच्या मध्य भागात हा किल्ला आहे. 1766 साली या किल्ल्याची बांधणी करण्यात आली. हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159280-tipu7.jpg)
3/8
![इंग्रजांशी हातमिळवणी नाही...
वयाच्या केवळ 18 व्या वर्षी टीपूनं पहिलं युद्ध जिंकलं होतं. इंग्रजांसोबत भारतीय शासकही टीपूचे शत्रू बनले होते. परंतु, उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही भारतीय शासकावर विजय मिळवण्यासाठी त्यानं इंग्रजांशी तडजोड किंवा हातमिळवणी केली नाही. (हैदराबादच्या निजामानं मात्र टीपूच्या विरुद्ध इंग्रजांशी हातमिळवणी केली)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159278-tipu6.jpg)
इंग्रजांशी हातमिळवणी नाही...
वयाच्या केवळ 18 व्या वर्षी टीपूनं पहिलं युद्ध जिंकलं होतं. इंग्रजांसोबत भारतीय शासकही टीपूचे शत्रू बनले होते. परंतु, उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही भारतीय शासकावर विजय मिळवण्यासाठी त्यानं इंग्रजांशी तडजोड किंवा हातमिळवणी केली नाही. (हैदराबादच्या निजामानं मात्र टीपूच्या विरुद्ध इंग्रजांशी हातमिळवणी केली)
4/8
![इंग्रजांनी प्रेतावरून काढली होती अंगठी
टीपू सुलतानच्या हातातली 'राम' लिहिलेली अंगठी इंग्रजांनी त्यांच्या प्रेतावरून ओरबाडून काढली होती. इस्ट इंडिया कंपनीच्या सेनेच्या हातून मारले गेल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या हातातली अंगठी काढून आपल्याकडे ठेवली होती.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159276-tipu5.jpg)
5/8
![टीपूच्या हातात 'राम' लिहिलेली अंगठी
मुस्लीम शासक असला तर टीपू सुलतानच्या हाताच्या बोटामध्ये 'राम' असं अक्षर लिहिलेली अंगठी दिसत होती. टीपू सुलतान हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वीच या अंगठीचा लिलावदेखील पार पडला. लंडनमध्ये एक करोड रुपयांपेक्षा अधिक किंमतीत ही अंगठी विकली गेली.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159275-tipu4.jpg)
टीपूच्या हातात 'राम' लिहिलेली अंगठी
मुस्लीम शासक असला तर टीपू सुलतानच्या हाताच्या बोटामध्ये 'राम' असं अक्षर लिहिलेली अंगठी दिसत होती. टीपू सुलतान हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वीच या अंगठीचा लिलावदेखील पार पडला. लंडनमध्ये एक करोड रुपयांपेक्षा अधिक किंमतीत ही अंगठी विकली गेली.
6/8
![विजय माल्याकडे आहे टीपू सुलतानची तलवार...
टीपू सुलतानची तलवार सध्या 'किंगफिशर'चा मालक विजय माल्या याच्याकडे आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावत माल्यानं टीपूची 200 वर्षांपूर्वीची एक तलवार पाच लाख पाऊंडपेक्षा अधिक रक्कम देऊन खरेदी केली होती.
या दुर्मिळ आणि ऐतिहासिक तलवारीवर कांस्याची मूठ आहे... याला वाघाच्या तोंडाचा आकार देण्यात आलाय. ही तलवार इंग्रजांना टीपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर पडलेली सापडली होती.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159274-tipu3.jpg)
विजय माल्याकडे आहे टीपू सुलतानची तलवार...
टीपू सुलतानची तलवार सध्या 'किंगफिशर'चा मालक विजय माल्या याच्याकडे आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावत माल्यानं टीपूची 200 वर्षांपूर्वीची एक तलवार पाच लाख पाऊंडपेक्षा अधिक रक्कम देऊन खरेदी केली होती.
या दुर्मिळ आणि ऐतिहासिक तलवारीवर कांस्याची मूठ आहे... याला वाघाच्या तोंडाचा आकार देण्यात आलाय. ही तलवार इंग्रजांना टीपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर पडलेली सापडली होती.
7/8
![खरं नाव फतेह अली टीपू
मैसूरचा सुलतान हैदर अली यांच्या घरी 20 नोव्हेंबर 1750 रोजी 'देवनहल्ली'मध्ये टीपूचा जन्म झाला. हे ठिकाण सध्या कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात आहे. टीपू सुलतानचं पूर्ण नाव फतेह अली टीपू असं होतं. टीपूच्या वडिलांनी दक्षिणेत आपल्या शक्तीच्या जोरावर विस्ताराला सुरुवात केली होती. याचमुळे इंग्रजांसोबत निजाम आणि मराठेही त्यांचे शत्रू बनले होते.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159273-tipu2.jpg)
खरं नाव फतेह अली टीपू
मैसूरचा सुलतान हैदर अली यांच्या घरी 20 नोव्हेंबर 1750 रोजी 'देवनहल्ली'मध्ये टीपूचा जन्म झाला. हे ठिकाण सध्या कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात आहे. टीपू सुलतानचं पूर्ण नाव फतेह अली टीपू असं होतं. टीपूच्या वडिलांनी दक्षिणेत आपल्या शक्तीच्या जोरावर विस्ताराला सुरुवात केली होती. याचमुळे इंग्रजांसोबत निजाम आणि मराठेही त्यांचे शत्रू बनले होते.
8/8
![कर्नाटक सरकारचा टीपू सुलतानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याच्या निर्णयानं एका नव्या वादाला तोंड फुटलं. याचा विरोध करण्यासाठी झालेल्या प्रदर्शनात मंगळुरूमध्ये एका विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यूही झालाय.
भाजप आणि आरएसएस ज्या टीपू सुलतानला विरोध करताना दिसतायत त्या टिपू सुलतानसंबंधी जाणून घेऊयात काही फारशा माहीत नसलेल्या या गोष्टी...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/11/11/159272-tipu1.jpg)