....आणि परंपरा मोडत तुकाराम महाजांच्या पालखीचं प्रस्थान

Jun 12, 2020, 17:34 PM IST
1/7

दरवर्षी चातकाप्रमाणं आषाढी एकादशी आणि ला़डक्या विठुरायाच्या भेटीला जाण्याची वाट पाहणाऱ्या वारकरी मंडळींमध्ये कमालीचा उत्साह आणि तितकीच उत्सुकता पाहायला मिळते. पण, यंदाच्या वर्षी मात्र त्यांच्या या भक्तिमय उत्साहावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी विठुरायाच्या भेटीसाठी निघणाऱ्या संतांच्या पालख्यांची परंपराही खंडित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

2/7

पालखी सोळ्यानंतर सहसा संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेनं मार्गी लागतात. पण यंदा मात्र ही परंपरा मोडत पालख्या मूळ मंदिरांतच स्थिरावणार आहेत. जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. 

3/7

शुक्रवारी दुपारी मोजक्या वारकरी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. टाळ, मृदंग, चिपळ्यांच्या नादात पालखीनं देहूच्या मंदिरातून प्रस्थान ठेवलं. पण, ती पुढं विठुरायाच्या भेटीसाठी मात्र निघाली नाही. 

4/7

विठुनामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह असं सर्व वातावरण देहूमध्ये पाहायला मिळालं. थोड्याथोडक्या संख्येनं असणाऱ्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा एकच नाद करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचा उत्साह पाहाण्याजोगा होता. 

5/7

अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत तुकाराम महाराचांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. 

6/7

यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळं पालखी पायवारीतून नव्हे, तर मोजक्या मंडळींसह थेट पंढरपूरात दाखल होणार आहे. 

7/7

विठुरायाच्या भेटीसाठी पायीवारीनं जाता न येण्याची नाराजी वारकरी वर्गात असली तरीही देशावर आणि साऱ्या जगावरच असणाऱ्या या कोरोनारुपी संकटाचा नायनाट व्हावा अशीच प्रार्थना विठुरायाचरणी ते करत आहेत.