IND vs AUS: खेळण्याआधीच भारताला मोठा धक्का, पहिला सामना रद्द होणार? राहुल द्रविड का संतापला आहे?

IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पूर्ण तयारी झाली आहे. 9 फेब्रुवारीला नागपुरात (Nagpur) पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) खेळपट्टीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाणार असून आयोजक तयारी करत आहेत.   

Feb 07, 2023, 16:59 PM IST

पण सामना सुरु होण्याआधीच मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर नाराज आहे. राहुल द्रविडने ही खेळपट्टी बदलण्याची मागणी केली आहे. खेळपट्टीवर गवत पाहून राहुल द्रविड संतापला होता. (AFP)

 

1/7

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करत आहे. घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली असल्या कारणाने भारताला पराभूत करणं कोणत्याही संघासाठी सोप्पं नसतं. दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. (AFP)  

2/7

पण सामना सुरु होण्याआधीच मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर नाराज आहे. राहुल द्रविडने ही खेळपट्टी बदलण्याची मागणी केली आहे. खेळपट्टीवर गवत पाहून राहुल द्रविड संतापला होता. (AFP)  

3/7

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, राहुल द्रविडने सामन्यासाठी दुसऱी खेळपट्टी निवडली आहे. क्युरेटर्स आता ही खेळपट्टी तयार करत आहेत. व्यवस्थापन पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीला महत्त्व देत असल्याची माहिती आहे. (AFP)  

4/7

नागपूरमधील जमाथा स्टेडिअममध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. याआधी 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने याच मैदानावर भारताचा पराभव केला होता. त्यावेळी कर्णधार सौरव गांगुलीने खेळपट्टीवर गवत असल्याने नाराजी जाहीर केली होती आणि सामन्यातून माघार घेतली होती. (AFP)  

5/7

भारतीय संघाबद्दल बोलायचं गेल्यास चार फिरकी गोलंदाजांना पहिल्या सामन्यात खेळवलं जाऊ शकतं. यामध्ये आर अश्विन टॉपवर आहे. अश्विनने 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संधी दिली जाऊ शकते. (AP)  

6/7

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा फिरकी गोलंदाजांविरोधात चांगला रेकॉर्ड नाही. भारतीय संघ याच गोष्टीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात पात्र होण्यासाठी भारताला 4 पैकी किमान 3 सामने जिंकण्याची गरज आहे. (AP)  

7/7

दरम्यान भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायला गेल्यास, टॉप 5 पैकी 4 फिरकी गोलंदाज आहेत. यामध्ये अनिल कुंबळे 350 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर आर अश्विन (312), हरभजन सिंग (265), कपिल देव (219) आणि जाडेजा (172) यांचा समावेश आहे. (PTI)