मुंबईहून कोकणात निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला... आजीसह दोन नातवांचा मृत्यू

गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मुंबईहून कोकणात निघालेल्या तावडे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भीषण अपघातात आजीसह दोन नातवांचा मृत्यू झाला आहे.

Apr 07, 2023, 18:40 PM IST
1/6

accident news

मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि मारुती इस्टीलो कारमध्ये हा भीषण अपघात झाला.

2/6

mumbai goa highway accident latest news

या अपघातात आजीसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.

3/6

accident between truck and car

मुंबईतील बोरिवली येथे राहणारे तावडे कुटुंबीय आपल्या कारमधून देवगडला जात होते. मात्र माणगावमधील कशेणे गावाच्या हद्दीत त्यांची कार आणि ट्रकमध्ये धडक झाली.

4/6

mumbai goa highway accident death

रिवान दर्शन तावडे (3), रित्या दर्शन तावडे (6 महिने) आणि वैशाली विजय तावडे (72) अशी मृतांची नाव आहेत.

5/6

mumbai goa highway accident

हा अपघात इतका भीषण होता की, कार आणि ट्रकच्या धडकेत मारुती इस्टीलोच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला.

6/6

mumbai goa highway

या भीषण अपघातात दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.