गुजरात लायन्सनं उडवला मुंबईचा धुव्वा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये गुजरातचा 6 विकेट्स आणि 13 बॉल राखून विजय झाला आहे.

Updated: May 21, 2016, 11:51 PM IST
गुजरात लायन्सनं उडवला मुंबईचा धुव्वा title=

कानपूर: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये गुजरातचा 6 विकेट्स आणि 13 बॉल राखून विजय झाला आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून गुजरातनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. 

मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 172 रन केल्या. मुंबईच्या नितीश राणानं 36 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली. 173 रनचा पाठलाग करायला आलेल्या गुजरातची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर ऍरोन फिंच शून्य रनवर आऊट झाला. त्यानंतर मात्र मॅक्कलम आणि कॅप्टन सुरेश रैनानं मुंबईच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.

मॅक्कलमनं 27 बॉलमध्ये 48 तर रैनानं 36 बॉलमध्ये 58 रन केले. पण मोक्याच्या क्षणी हे दोघं आऊट झाल्यानं मुंबईच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अखेर ड्वॅन स्मिथनं 23 बॉलमध्ये 37 आणि जडेजानं 15 बॉलमध्ये 21 रन करून गुजरातचा विजय निश्चित केला. या विजयामुळे गुजरात यंदाच्या मोसमात प्ले ऑफला पोहोचलं आहे. तर मुंबईचं प्ले ऑफला जायचं स्वप्न भंगलं आहे.