पार्किंगच्या अडचणींमळे गाडीचं स्वप्न भंगणार?

राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधनं येण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 21, 2013, 11:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधनं येण्याची शक्यता आहे.
‘पार्किंगची जागा असेल तरच गाडी विकत घेण्यासाठी परवानगी द्यावी’ अशा प्रकराचा प्रस्तावच राज्याच्या परिवहन विभागाने राज्य सरकारला पाठवला आहे. किमान प्रमुख शहरांत या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची मागणी या शिफराशीमध्ये करण्यात आलीय. राज्यात वाहनांची संख्या एक कोटी पंचाहत्तर लाखांपेक्षा जास्त असून एकट्या मुंबईत ही संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईसारख्या शहरांत दररोज ३०० पेक्षा जास्त नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय, प्रदूषण आणि लोकांचा वेळ वाया जाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. आहे. त्यातच हाय-वे वगळता बहुतेक सर्व रस्त्यांवरच बाजूला वाहने पार्क केली जातात. यामुळे रस्ता अरुंद होतो.

त्यातच फेरिवाल्यांचे फूटपाथवर अतिक्रमण, पादचारी रस्त्यावर चालणे आणि यामुळे वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण होणं अशा अडचणींची एक श्रृंखलाच तयार होताना दिसते. वाहने स्वस्त झाल्याने वाहने घेणं परवडणारं ठरतंय. याच पार्श्वभूमीवर यासंबंधीच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पार्किंगची स्वतंत्र सोय असेल आणि तसा पुरावा दाखवला तरच गाडी विकत घेण्यास परवनागी देण्याची शिफारस परिवहन विभागाने केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.