चार महिने आचारसंहिता, सरकार बेजार...

नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमुळे तब्बल चार महिने राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्य सरकारनं नाराजी व्यक्त केलीये. 

Updated: Oct 18, 2016, 06:09 PM IST
चार महिने आचारसंहिता, सरकार बेजार...  title=

मुंबई : नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमुळे तब्बल चार महिने राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्य सरकारनं नाराजी व्यक्त केलीये. 
 
 या आचारसंहितेमुळे सरकारचं कामकाज ठप्प होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आलीये. याबाबत राज्याचे मुख्य आयुक्त जे.एस. सहारिया यांना सरकारतर्फे पत्र पाठवलं जाणार असून जिथं निवडणूक आहे त्याच भागात आचार संहिता लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीये. 
 
 मात्र कामकाज ठप्प होण्यापेक्षा फडणवीस सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त होऊ घातलेली जाहिरातबाजी आणि कार्यक्रमांवर गदा येणार असल्यामुळेच सरकार अस्वस्थ झाल्याचं बोललं जातंय.