माता न तू वैरिणी...

भाईंदरमध्ये महिलेनं आपल्या दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 4, 2013, 04:34 PM IST

www.24tass.com, झी मीडिया, मुंबई
भाईंदरमध्ये महिलेनं आपल्या दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मिरा रोडच्या साईबाबा नगर इथल्या सुंदरी विहार इमारतीमध्ये राहणारी सकीना आसिफ अली या ३० वर्षीय महिलेनं आपली साडेतीन वर्षाची मुलगी अलीमा आणि दोन महिन्यांची मुलगी नुरेन्ना यांना ड्रममध्ये बुडवून ठार मारलं. नंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली.
यावेळी सकीना हिचा सात वर्षांचा मुलगा यासिन हॉलमध्ये टीव्ही पाहत होता. त्यानं शेजाऱ्यांना बोलावून झालेला प्रकार सांगितला. कौटुंबिक कलहातून सकीना हिनं हे पाऊल उचललं असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. सबीनाचं तिच्या नवऱ्याबरोबर ईदच्या खरेदीवरुन भांडण झालं होतं, अशी माहिती मिळतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.