रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटक?

बदलापुरात सहा तास चालेल्या प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटकांचा हात असल्याचा संशय आज रेल्वेचे ड़ीआरएम अभिताभ ओझा यांनी व्यक्त केला आहे.

Updated: Aug 12, 2016, 12:22 PM IST
रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटक? title=

बदलापूर : बदलापुरात सहा तास चालेल्या प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटकांचा हात असल्याचा संशय आज रेल्वेचे ड़ीआरएम अभिताभ ओझा यांनी व्यक्त केला आहे. हे आंदोलन उत्स्फूर्त नव्हतं अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवाशांनी बदलापूर स्टेशनवर आंदोलन केलं. तब्बल सहा तास हे आंदोलन चाललं. या काळामध्ये बदलापूरवरून अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक बंद होती. सहा तासानंतर अखेर बदलापूरवरून मुंबईच्या दिशेनं पहिली ट्रेन धावली.