`जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध कायम`

जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 22, 2013, 11:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.
‘आपण राज्यपालांना भेटून विरोध व्यक्त करणार’ असल्याचं सनासन संस्थेनं सांगितलंय. तर वारकऱ्यांनीही जादू-टोणाविरोधी कायद्याच्या वटहुकुमाला विरोध दर्शवलाय. भावनेच्या भरात वटहुकूम काढू नये, अशी भूमिका ‘वारकरी साहित्य परिषदे’चे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी स्पष्ट केलीय.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वटहुकूम काढण्याची मागणी यावेळी केली, त्याला सर्वच मंत्र्यांनी पाठिंबा दिला. वटहुकूम काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे समजते. वटहुकूम काढल्यानंतर हिवाळी अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेऊन त्याचे कायद्यात रूपांतर केलं जाईल, अशी भूमिका सरकारनं घेतलीय तर शिवसेना आणि भाजप या विरोधी पक्षांनी याबाबत सावध पवित्रा घेतलाय. याबाबत सविस्तर चर्चा होऊनच विधेयक मंजूर करावे, अशी भाजपची भूमिका आहे तर स्वतंत्र कायद्याची गरजच नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

राज्य सरकारला उशिरा सुचलेले हे शहाणपण असल्याचे मानले जातेय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलंय. अशी वारकऱ्यांची भूमिका आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.