रत्नागिरी : शहरात पोलिसांची दहशत राहिली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण सध्या शहरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातलाय.
एकाच दिवशी रत्नागिरी शहरातल्या मुख्य वस्तीमधल्या सहा फ्लॅटवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. भरदिवसा चोरट्यांनी रहाटाघर, उद्यमनगर आणि मारुतीमंदिर या भागातले बंद फ्लॅट फोडून दागिने आणि रोख रक्कम लुटलीय.