सदाभाऊंचं राजू शेट्टींना असंही उत्तर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद काही क्षमता शमत नाही, खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या बगल बच्चे प्रस्थापितांच्या पक्षात असतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 15, 2017, 01:56 PM IST
सदाभाऊंचं राजू शेट्टींना असंही उत्तर title=

रत्नागिरी :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद काही क्षमता शमत नाही, खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या बगल बच्चे प्रस्थापितांच्या पक्षात असतात, या वक्तव्याला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे, प्रत्येक गोष्टीची एक सीमारेषा असते.

आपण जेव्हा चळवळीत काम करत असतो तेव्हा चळवळीत काम करणाऱ्याला, देखील स्वतः च एक घर असतं, त्या घराला जेंव्हा धक्का लागतो तेव्हा तेव्हा त्याला ही वेदना होतात, असं म्हणत राजू शेट्टी यांच्या वक्तव्याला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलंय.

तसेच 'समजने वालो को इशारा काफी है', अस म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना सुनावलं आहे. तर दुसरीकडे यापूर्वी राजू शेट्टी यांनी ही जुगलबंदी माध्यमांनी लावून दिल्याचं म्हटलं होतं.