नोटबंदीवर रामदास आठवलेंची कविता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे.

Updated: Dec 16, 2016, 08:04 PM IST
नोटबंदीवर रामदास आठवलेंची कविता! title=

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. नोटबंदीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावरून संसदेचं हिवाळी अधिवेशनात एक दिवसही कामकाज झालं नाही.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचे समर्थन केलय. नेहमीच वेगळ्या कवितांनी चर्चेत येणाऱ्या आठवले यांनी याच विषयावर पत्रकार परिषदेत कविता करत या निर्णयाला समर्थन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा योग्य असल्याचं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवल्ये यांनी व्यक्त केलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकारची पाठराखण रामदास आठवले यांनी केलीय.

पाहा काय म्हणाले रामदास आठवले