कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक- रेल्वेमंत्री

कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. तसंच कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. मालवण इथं रेल्वेमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं ते बोलत होते. 

Updated: Jan 11, 2015, 05:47 PM IST
कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक- रेल्वेमंत्री title=

मालवण: कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. तसंच कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. मालवण इथं रेल्वेमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं ते बोलत होते. 

कोकण रेल्वेकडून आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी उभारला जावू शकतो, असंही प्रभू म्हणाले. 

चीनच्या सीमेलगत विस्तारणार रेल्वेचे जाळे

पूर्वांचलमधील आठ राज्यांमध्ये अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही. चीनच्या सीमेलगत असलेल्या या भागात रेल्वेचं जाळं वाढविण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी केली. मार्च-एप्रिलमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत सीमेलगतच्या राज्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

सत्कारप्रसंगी ते म्हणाले, देशाचा विकासदर वाढण्यामध्ये कनेक्टीव्हिटी महत्त्वाची आहे. रेल्वेमुळं देशाचं अर्थकारण बदलू शकतं. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे. त्यामुळं पूर्वांचलांमधील राज्यात रेल्वेचं जाळं विणण्यासाठी केंद्रानं २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरविलं आहे.

रेल्वे, विमानसेवेनं सागरी किनारे जोडणार

देशाला ७ हजार ८०० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यांना रेल्वे आणि विमानसेवेनं जोडण्याची योजना आहे. यातून आपली सध्या असलेली २ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पुढील १० वर्षांत १० ते १५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा सुरेश प्रभूंनी व्यक्त केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.