गोठ्याला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

उस्मानाबादमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत एका पती - पत्नीचा होरपळून मृत्यू झालाय.

Updated: Dec 23, 2015, 11:07 AM IST
गोठ्याला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा होरपळून मृत्यू title=

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत एका पती - पत्नीचा होरपळून मृत्यू झालाय.

कळंब तालुक्यातील खामसवाडीमध्ये ही घटना दुर्दैवी घटना घडलीय. सखाराम शेळके आणि त्यांची पत्नी यांचा या घटनेत मृत्यू झालाय. 

शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे शेळके यांच्या गोठ्यात आग लागली होती. या आगीत शेतीसाठी उपयुक्त असलेलं साहित्य जळून खाक झालंय.