औरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू

औरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू झालाय. दीपाली गोर्डे असं या तरुणीचं नाव आहे. औरंगाबादच्या बालानगर इथं राहणारी दीपाली कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. 

Updated: Mar 31, 2017, 01:47 PM IST
औरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू  title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू झालाय. दीपाली गोर्डे असं या तरुणीचं नाव आहे. औरंगाबादच्या बालानगर इथं राहणारी दीपाली कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. 

त्यावेळी भर उन्हास कापूस वेचल्याने दीपालीला अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. मात्र तिथं पोहचण्याआधीच दीपालीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 

दीपाली ही अकरावीमध्ये शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र उन्हाचा कडाका जाणवतोय. त्यामुळं अंगाची लाही लाही करणा-या आणि जीवघेण्या उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्याचं आवाहन करण्यात येतंय.