अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील ३ लहान मुलांचा मृत्यू

एकाच कुटुंबातल्या सहा जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जुन्नरच्या ओतूर गावात ही घटना घडली आहे.

Updated: Nov 1, 2016, 12:25 PM IST
अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील ३ लहान मुलांचा मृत्यू title=

जुन्नर : एकाच कुटुंबातल्या सहा जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जुन्नरच्या ओतूर गावात ही घटना घडली आहे.

राहुल फुलमाळी, धनराज फुलमाळी, साईराज फुलमाळी अशी मृत मुलांची नावं आहेत. तर अन्य तिघांवर नगर येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.