राज्याचं सिंचन वाढवलं, हा घोटाळा नाही : अजित पवार

मी सिंचन घोटाळा केला नाही, विरोधकांनी फक्त आपल्या नावाचं वावटळ उठवलं, बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. राज्याचं उलट सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Updated: Oct 6, 2014, 11:11 PM IST
राज्याचं सिंचन वाढवलं, हा घोटाळा नाही : अजित पवार title=

औरंगाबाद : मी सिंचन घोटाळा केला नाही, विरोधकांनी फक्त आपल्या नावाचं वावटळ उठवलं, बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. राज्याचं उलट सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सिंचनासह विविध घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री यांना प्रचारात लक्ष्य केलं जातयं. पण अजित पवारांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. 

औरंगबादमधील खुल्ताबादमधील सभेत अजित पवारांनी आपल्यावरील आरोपांचाही समाचार घेतला.

मी कालपण स्वच्छ होतो, आज पण स्वच्छ आहे, आणि उद्या पण स्वच्छ राहिल असं सांगत अजित पवारांनी आपण भ्रष्टाचार केलाच नसल्याचा दावा केला आहे.

अजित पवारांनी नरेंद्र मोदींवरही तोफ डागली. नरेंद्र मोदी सरकारने स्वप्नं दाखवली, मात्र कृती काहीच केली नाही, असा आरोपही अजित पवारांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.