राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.

Updated: Oct 23, 2014, 09:06 AM IST
राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले title=
फोटो सौजन्य: DNA

नगर : संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.

राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यात भाजपासोबत जाताना सत्तेत दहा टक्के वाटा मिळावा, अशी बोलणी झाली होती. मात्र, आठपैकी आमची एकही जागा निवडून आली नाही त्यामुळे आता किमान दोन मंत्रिपदे आणि महामंडळात आम्हाला सहभाग मिळावा, अशी मागणी केल्याचे खासदार आठवले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत रिपाइंच्या वाट्याला आठ जागा आल्या होत्या मात्र, अगदी शेवटच्या टप्प्यात आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले. युतीच्या घोळात हा विलंब झाला या आठ जागा अगदी दोन ते चार हजारांच्या फरकाने हातातून गेल्या तरी एकही जागा जिंकता आली नाही, याची सल मनात आहे एकही जागा आली नसली तरी रिपाइंची मते ही भाजपासाठी प्रत्येक मतदारसंघात ग्रेसमार्क सारखी ठरली आहेत़ विधानसभेत निळा आणि भगवा फडकावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते मात्र, शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांच्या इगोमुळे युती तुटली युती टिकावी, यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.