आनंद यादव यांचा अल्प परिचय

 ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Updated: Nov 27, 2016, 10:58 PM IST
आनंद यादव यांचा अल्प परिचय  title=

मुंबई :  ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आनंद यादव (नोव्हेंबर ३०, १९३५ - नोव्हेंबर २७, २०१६) हे प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.

वारकऱ्यांनी आनंद यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. आनंद यादव पुस्तकाचे प्रकाशक व मुद्रक यांची पोलिसांनी जामिनावर सुटका केली. अजूनही गेली चार वर्षे ही मंडळी जामिनावर आहेत.

जीवन

आनंद यादव यांनी कोल्हापूर व पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला आहे.

पुरस्कार

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

प्रकाशित साहित्य

आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-

काव्यसंग्रह

हिरवे जग १९६०
मळ्याची माती१९७८
मायलेकरं (दी‍र्घकविता)१९८१

कथासंग्रह

खळाळ १९६७
घरजावई १९७४
माळावरची मैना १९७६
आदिताल १९८०
डवरणी (पुस्तक) १९८२
उखडलेली झाडे १९८६

व्यक्तिचित्रे

मातीखालची माती (१९६५)

ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ

स्पर्शकमळे (१९७८)
पाणभवरे (१९८२)
१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह
आत्मचरित्र मीमांसा
मराठी लघुनिबंधाचा इतिहास
ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव
ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या
मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती

कादंबरी

गोतावळा १९७१
नटरंग (पुस्तक) १९८०. या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला.
एकलकोंडा १९८०
माऊली १९८५
संतसूर्य तुकाराम

आत्मचरित्रात्मक

झोंबी १९८७. या कादंबरीवर लवकरच मराठी चित्रपट बनेल, अशी बातमी आहे.
नांगरणी १९९०
घरभिंती १९९२
काचवेल

बालकथा

उगवती मने