'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश

माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय. 

Updated: Jan 9, 2015, 02:17 PM IST
'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश  title=

मुंबई : माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय. 

१९९४ मध्ये आपण जेव्हा 'मिस वर्ल्ड'च्या खिताब आपल्या नावावर केला होता तेव्हा आपलं शरीर बिकिनी घालण्यासाठी फिट नव्हतं... असं ऐश्वर्यानं म्हटलंय. 

मिस वर्ल्ड कॉन्टेस्टच्या अध्य७ ज्युलिया मोर्ले यांनी डिसेंबर २०१४ मध्ये इंटरनॅशनल कॉन्टेस्टमधून बिकिनी राऊंड हटविण्याची घोषणा केली होती... या राऊंडचा ना या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी महिलांना फायदा आहे... ना आयोजकांना... असं म्हणत त्यांनी हा राऊंड बंद केला होता.... या निर्णयावर आपण खूश असल्याचं ऐश्वर्यानं म्हटलंय. 

'मी जेव्हा मिस वर्ल्ड म्हणून निवडण्यात आलं होतं तेव्हा नक्कीच ८७ स्पर्धकांमध्ये माझं शरीर बिकिनी परिधान करण्यासाठी सर्वश्रेष्ठ नव्हतं... आणि मी असं दाव्यासहीत म्हणू शकते... तरीही मी हा खिताब जिंकला' असं नुकतंच सगळ्यात यशस्वी मिस वर्ल्ड अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेल्या ऐश्वर्यानं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.