शहीदांमध्ये महाराष्ट्राचे तीन जवान

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद झाले आहेत.

Updated: Sep 19, 2016, 12:49 PM IST
शहीदांमध्ये महाराष्ट्राचे तीन जवान title=

श्रीनगर : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद झाले आहेत, आतापर्यंत २० जवान शहीद झाले असल्याचं सांगण्यात येतंय, तीन जवानांनी उपचारादरम्यान प्राण सोडल्याने शहीदांचा आकडा २० झाला आहे.
 
या हल्ल्यात महाराष्ट्राचंही मोठं नुकसान झालं आहे, साताऱ्यातील जाशी गावचे लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे हे शहीद झाले आहेत, तर अमरावतीच्या नांदगावचे विकास जानराव उईके यांना देखील वीरमरण प्राप्त झालं आहे. तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते.