सुनंदा मृत्यू प्रकरण: आरोग्य मंत्र्यांनी मागवला रिपोर्ट

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ हळुहळू उकलतांना दिसतंय. एकीकडे शशि थरूर यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पुष्कर यांचा पोस्टमार्टेम बाबतचा एम्सचा रिपोर्ट मागवलाय. 

Updated: Jul 2, 2014, 12:51 PM IST
सुनंदा मृत्यू प्रकरण: आरोग्य मंत्र्यांनी मागवला रिपोर्ट title=

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ हळुहळू उकलतांना दिसतंय. एकीकडे शशि थरूर यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पुष्कर यांचा पोस्टमार्टेम बाबतचा एम्सचा रिपोर्ट मागवलाय. 

 

या दरम्यान, भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी सांगितलं की, ही नवी माहिती पुढे आल्याचं काही आश्चर्य वाटत नाही. सुनंदा यांची हत्या खूपच प्रोफेशनली केली गेलीय. या प्रकरणाची विस्तारानं चौकशी होणं गरजेचं आहे. 

याप्रकरणी शशि थरूर यांनी काहीही बोलण्यास नकार देत म्हटलंय, सध्या पोलीस तपास सुरू आहे. एम्सचे फॉरेंसिक विभागाचे हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी थरूर यांनी दबाव टाकल्याचा आरोप केलाय. 

आपल्याला सुधीर गुप्ता यांचं पत्र मिळाल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच एम्सकडून प्रकरणाचा विस्तृत रिपोर्ट मागितलाय. सुधीर गुप्ता यांनी याप्रकरणी पंतप्रधानांनाही पत्र लिहिलंय. 

पाहा काय आहे रिपोर्टमध्ये -

  • सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनंदा पुष्करचा मृत्यू कोणत्याही विषानं किंवा डिप्रेशनच्या गोळ्यांनी झाला नाही. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काही वेगळंच आहे. ज्यात सांगितलं गेलंय सुनंदाच्या मृत्यूचं कारण औषधं आणि एलप्रेक्स नावाची गोळी आहे. विसरा रिपोर्ट मार्च 2014मध्ये आला होता. 
  • या खुलाशानंतर तपास अधिकारीही अवाक आहेत, ज्यांना सुनंदाच्या हॉटेलच्या रूममध्ये एलप्रेक्सची रिकामी स्ट्रीप मिळाली होती. जर विसरा रिपोर्ट खरी आहे असं धरलं तर सुनंदा यांनी औषधांचा योग्य डोज घेतला होता आणि एलप्रेक्सची रिकामी स्ट्रिप अधिकाऱ्यांना भलतीकडे वळवण्यासाठी ठेवली गेली होती, असं म्हणावं लागेल. 
  • पोलिसांना सुनंदा यांच्या रूममध्ये एलप्रेक्सच्या दोन स्ट्रिप्स मिळाल्या होत्या. एका स्ट्रिपमध्ये 15 गोळ्या होत्या. एक स्ट्रिप पूर्ण रिकामी होती आण दुसऱ्यात तीन गोळ्या शिल्लक होत्या. आता प्रश्न हा निर्माण होतो की जर सुनंदा आपल्या औषधांचा योग्य डोज घेत होत्या तर रिकामी स्ट्रिप का मिळाली?
  • पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये हे सुद्धा लिहिलंय की सुनंदाच्या शरीरावर जखमांच्या 15 खुणा होत्या. यातील जास्त जखमा या सामान्य होत्या. ज्यामुळं मृत्यू होऊ शकत नाही. तर 12वी जखमी ही दातांनी चावल्याची होती आणि 10वी जखम ही इंजेक्शनची होती. 
  • सुधीर गुप्ता यांनी हे सुद्धा लिहिलंय की पोस्टमार्टेमच्या वेळी सुनंदा यांच्या शरीरातून दुर्गंधी गॅसता वास येत होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.