२०१७ मध्ये भारताचं दुसरं चांद्रयान मोहीम

पहिलं चांद्रयान मोहीम यशस्वीपणे झाल्यानंतर आता भारत दुसऱ्य़ा चांद्रयान मोहिमेची तयारी करणार आहे. 

Updated: Aug 25, 2014, 06:04 PM IST
२०१७ मध्ये भारताचं दुसरं चांद्रयान मोहीम title=

सालेम (तमिळनाडू): पहिलं चांद्रयान मोहीम यशस्वीपणे झाल्यानंतर आता भारत दुसऱ्य़ा चांद्रयान मोहिमेची तयारी करणार आहे. 

पहिल्या आणि दुसऱ्य़ा चांद्रयान मोहीम प्रकल्पाचे संचालक एम आनंदपुरी यांनी सालेम विद्यालयाच्या हीरकमहोत्सवाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना सांगितले की, ''पहिली चांद्रयान मोहिम २२ ऑक्टोबर २००८ रोजी यशस्वीपणे सुरू करण्यात आली होती. 

त्यांनी पुढे म्हटलं की, ''भारताची दुसरी चांद्रयान मोहीम २०१७ मध्ये सुरू केलं जाईल.''

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.