पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित पुन्हा भारताविरोधात बरळले

पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

Updated: Aug 14, 2016, 06:35 PM IST
पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित पुन्हा भारताविरोधात बरळले  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरला स्वातंत्र्य मिळावे यासाठी यावर्षीचा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव समर्पित करुया असं बासीत म्हणाले आहेत. 

काश्मीरवर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानकडून मांडण्यात आला होता. मात्र भारत-पाक चर्चेचा काश्मीरशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करत भारताकडून हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. त्यानंतर बासीत यांनी दिल्लीत हे वक्तव्य केलं आहे.