इंजिनिअर महिलेला खूर्चीला बांधून जिवंत जाळलं ?

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एका महिला इंजीनियरला खूर्चीला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनास्थळी फक्त चप्पल आणि हड्ड्या मिळाल्या आहेत. या महिलेच्या आईने चप्पल ओळखून या महिलेची ओळख पटवली आहे. घटनास्थळी एक नोट मिळाली आहे. पण पोलिसांनी प्रथम हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

Updated: Oct 25, 2016, 11:23 AM IST
इंजिनिअर महिलेला खूर्चीला बांधून जिवंत जाळलं ? title=

पटना : बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एका महिला इंजीनियरला खूर्चीला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनास्थळी फक्त चप्पल आणि हड्ड्या मिळाल्या आहेत. या महिलेच्या आईने चप्पल ओळखून या महिलेची ओळख पटवली आहे. घटनास्थळी एक नोट मिळाली आहे. पण पोलिसांनी प्रथम हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

या नोटमध्ये महिलेने तिच्या मुलांची काळजी घेण्याची गोष्ट म्हटली आहे. सरिता देवी असं या महिलेचं नाव आहे. मनरेगामध्ये ही महिला कार्यरत होती. रविवार उशिरा रात्री अहियापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.

सोमवारी सकाळी आजुबाजुच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. महिलेचं शरीर संपूर्णपणे जळलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना संशय आहे की शरीराला जाळण्यासाठी केमिकलचा वापर केला गेला आहे.

महिला इंजीनिअर आणि तिचा पती यांच्यात वाद सुरु होता. महिला तिच्या एका मुलासोबत राहत होती. घटनेच्या दिवशी मुलगा आजीच्या घरी गेला होता. तर दुसरा मुलगा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहत आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.