त्या भारतीय जवानाने चुकून सीमा पार केली....

भारताच्या एका जवानाने चुकून भारताची सीमा पार केल्याची माहिती, भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिली आहे. 

Updated: Sep 29, 2016, 11:35 PM IST
त्या  भारतीय जवानाने चुकून सीमा पार केली.... title=

नवी दिल्ली : भारताच्या एका जवानाने चुकून भारताची सीमा पार केल्याची माहिती, भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिली आहे. या जवानाचा आणि सर्जिकल ऑपरेशनचा काहीही संबंध नसल्याचंही भारतीय जवानाने म्हटलं आहे.

अनेक वेळा दोन्ही देशांचे जवान चुकून सीमा पार करतात, असे प्रकार अनेक वेळा घडतात, तेव्हा योग्य तो सोपस्कार करून जवान त्या-त्या देशात परत पाठवले जातात असं सांगण्यात येतं. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानाने शस्त्रासह सीमा पार केल्याची माहिती भारताने, पाकिस्तानला दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

एका भारतीय जवानाला पाकिस्तान आर्मीने ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानने अजून केला नसला, तरी पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने ही बातमी छापली आहे.